शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्थेचा सोयीस्करपणे वापर : निरंजन टकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:40 IST

सातारा : ‘सत्ताधारी न्यायव्यवस्था त्यांच्यासाठी सोयीस्करपणे वापरतात, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात,’ असे विधान ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले (नाशिक) यांनी सातारा येथे बोलताना केले.

ठळक मुद्देपरिवर्तनवादी समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात मत व्यक्त

सातारा : ‘सत्ताधारी न्यायव्यवस्था त्यांच्यासाठी सोयीस्करपणे वापरतात, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात,’ असे विधान ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले (नाशिक) यांनी सातारा येथे बोलताना केले. न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी राज्यसरकार, सीबीआय यंत्रणा कशी वागत आहे? हे स्पष्ट करून न्यायव्यवस्था पोखरली जात असल्याचेही ते म्हणाले.

सातारा येथील परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सातारा पाठक भवनमध्ये ‘भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचे भवितव्य’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोेलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर होते. विचारमंचावर विजय मांडके, जयंत उथळे होते.न्यायव्यवस्था व सत्ताधारी यांच्या अभद्र व हितसंबंधी आता जनतेनेच बोलले पाहिजे. जनतेने गप्प राहू नये. बोलला नाहीतर जिवंत राहिला काय, किंवा मेला काय तुमचा काय उपयोग? लोकशाही व न्यायव्यवस्था रक्षणाची जबाबदारी जनतेइतकीच माध्यमांची आहे. माध्यमांनी सत्य बाहेर आणले पाहिजे.

सर्वोच्य न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची घुसपूस सांगितली. माझ्यासह देशातील बहुसंख्य जनतेने त्यांचे स्वागत केले. भारतीय लोकशाहीसाठी हे स्वागतार्ह आहे. मात्र, त्यांची व सरन्यायाधीशांची बैठक झाल्यानंतर या न्यायाधीशांचे समाधान झाल्याने ते पुन्हा कामावर हजर झाले. त्या बैठकीत काय झाले? काय ठरले? हे जनतेला कळले पाहिजे, असेही निरंजन टकले यांनी सांगितले.यावेळी निरंजन टकले यांनी न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण, मालेगाव स्फोट प्रकरण, बर्ड फ्ल्यू प्रकरण, कोपर्डी प्रकरण यासंदर्भात सत्ताधारी व तपास यंत्रणा न्यायव्यवस्था यांच्या हस्तक्षेपाविषयी धक्कादायक माहिती सांगितली. भारतीय लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया यासंदर्भातही त्यांनी माहिती दिली. भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेपुढे जर जनतेने लक्ष दिले नाही तर गंभीर आव्हान उभे राहू शकते, असेही ते म्हणाले. जयंत उठले यांनी प्रास्ताविक केले. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर, अरुण गोडबोले, डॉ. प्रसन्न दाभोलकर, डॉ. सुहास पोळ, डॉ. राजश्री देशपांडे, कॉ. किरण माने, कॉ. वसंतराव नलावडे, कॉ. भगवानराव भोसले, राजेंद्र गलांडे, रणजित भोसले, मिनाज सैयद, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ आदी उपस्थित होते.सातारा येथे आयोजित व्याखानात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान झाले. यावेळी विजय मांडके, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, जयंत उथळे उपस्थित होते.